परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला २५ वर्षे पूर्ण; भारतातील ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्रात ६,००० रहिवाशांचा टप्पा, भविष्याभिमुख दृष्टीकोन अधोरेखित
पुणे, महाराष्ट्र (महाराज्य टाईम्स): — नवे निवासी प्रकल्प साकारण्यात अग्रणी असलेल्या परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) प्रा. लि. या नामांकित विकसकाच्या ‘अथश्री’ या ज्येष्ठ नागरिक निवास उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतातील संघटित ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्राच्या घडणीत ‘अथश्री’ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरदृष्टीतून सुरू झालेला हा उपक्रम आज सन्मान, स्वावलंबन आणि समुदायाधारित जीवनमूल्यांवर आधारलेली सक्षम व्यवस्था बनली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधत, वडोदरा येथे ‘अथश्री’च्या ६,००० व्या रहिवाशाला घराचा ताबा देण्याचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रहिवासी, व्यवस्थापन आणि भागीदार सहभागी झाले होते. आज ‘अथश्री’चे जाळे सुमारे १६ ज्येष्ठ नागरिक वसाहतींमध्ये विस्तारले असून, विविध शहरांमध्ये ३,००० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना निवास व सुविधा दिल्या जात आहेत. कार्यक्रमाची सुरुवात परांजपे स्कीम्सचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्या भाषणाने झाली. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी ‘अथश्री’चा प्रवास आणि वाढती गरज याविषयी मनोगत व्यक्त केले. यानंत...