पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बारामतीत स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद..!

इमेज
एकूण १,४५६ रक्तदात्यांचे रक्तदान; समाजसेवेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.. महाराज्य टाईम्स दि. १९ :         दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शारदा प्रांगण व विद्या प्रतिष्ठान या दोन केंद्रांवर पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १,४५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली. यामध्ये विद्या प्रतिष्ठान येथे २१७ तर शारदा प्रांगण येथे १,२३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार यांनी भेट दिली.      शिबिराच्या प्रारंभापासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रथमच रक्तदान करणाऱ्...

स्व.अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्याचा महाराष्ट्र शासनाचा आदेश जारी

इमेज
महाराज्य टाईम्स: (बारामती)          सरकारने दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 22 जुलै रोजी साजरी होणारी त्यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार असून, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत शासनादेश आज १५ जुलै संध्याकाळी ६ वाजतां जारी केला आहे. या दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे अधिकृत आदेश राज्य शासनाने जारी केले. शासनाच्या या निर्णयामुळे अजितदादांच्या लोकसेवेचा वारसा आता अधिकृतपणे जपला जाणार आहे.    शासनाने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागणीची घेतली दखल: राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत सा...

बारामती नगर परिषद अँक्शन मोडवर: संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी तयारी

इमेज
महाराज्य टाईम्स (बारामती):  जगदगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरात मुक्कामी येत असते त्या अनुषंगाने बारामती नगरपरिषदेमार्फत संपूर्ण शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी ही माहिती दिली.      पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेने वेळेत साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे, रस्त्यावरील खड्डे, गतिरोधक दुरूस्ती व वाढलेली झाडे झुडपे काढण्यात येत आहेत. दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे, आणि मोबाईल शौचालयांची व्यवस्था असलेल्या सर्व परिसरांची तात्काळ स्वच्छता करून जागा उपलब्ध करण्याचे काम होत आहे.      सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलनाचे काम सुरू आहे. लाखॊं भाविकांचे आरोग्य, पिण्याचे पाणी व मुक्कामाची सोय याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भुसे यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना सांगितले.      यासोबतच शहरात निर्जंतुकीकरणासाठी जंतुनाशक औषधे व बीएचसी पावडर फवारण्यात येत आहे. दु...

योगेश नालंदे ठरले पहिले पत्रकार ज्यांना मिळाला राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार !!

इमेज
महाराज्य टाईम्स: - १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विभागातून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो.       बारामती मधील युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 2024 सालचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राज्यपाल श्री जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, दत्तात्रय भरणे कृषिमंत्री, आशिष जयस्वाल कृषी राज्यमंत्री, भरत शेठ गोगावले व इतर मान्यवर उपस्थित होते.       अवघ्या एक वर्षात तब्बल 365 शेतकऱ्यांच्या यशोगाथा शोधून त्यांना वृत्तपत्राच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी दिली. या यशोगाथांच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि सकारात्मक शेती संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा यासाठी कृषी प्रसाराचे मोठे कार्य केले. कृषी वाहिनीवर काम करताना बाजारभाव, हवामान अंदाज आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे नाट्यरूपंतर ऑडिओ बनवून रेडिओ वरून प्रसारित केले. यासह कृषी व...

पुणे जिल्ह्यातील सर्वच शाळांना उद्या ६ जुलै रोजी सुट्टी जाहिर !! - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

इमेज
महाराज्य टाईम्स: (बारामती) भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Thunder and lightning in Pune) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा दि.०६/०७/२०२६ रोजी बंद ठेवणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज आदेश जाहिर केले.       याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांना (जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा, खाजगी शाळा, अनुदानित व विना अनुदानित खाजगी शाळा, इंग्लिश मिडीयम शाळा, सर्व अंगणवाडी) या सर्व शाळांना दिनांक ०६/०७/२०२६ रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.        तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे...

पुणे येथील बालगंधर्व रंगमंच ५८ वा वर्धापन दिनी बारामतीच्या गायकांचा सन्मान !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स): बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापनदिनी बारामती व परिसरातील संगीत व गायन क्षेत्रातील नावाजलेल्या कलाकारांचा रिस्टार्ट एन्टरटेन्मेंट ग्रुप प्रस्तुत बहारदार कॅराओके गीतांच्या कार्यक्रम सादर करण्याची संधी आयोजकांनी देऊन ग्रुपचा मोठा सन्मान केला.        महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित, अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत, बालगंधर्व रंगमंदिराचा ५८ वा वर्धापन दिन महोत्सव २४, २५ व २६ जून २०२६ रोजी गेल्या १९ वर्षापासून सातत्याने आणि दिमाखात साजरा करण्यात येत असतो अशा प्रसंगी बारामतीच्या कलाकारांना आपली कला सादर करण्याची अमूल्य अशी संधी मिळाली होती. जुन्या गाण्यांच्या तालावर प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट:      रिस्टार्ट एन्टरटेन्मेंट ग्रुपने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील एकापेक्षा एक सरस, दर्जेदार आणि लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सुरेल गायन, उत्कृष्ट सादरीकरण आणि कलाकारांमधील समन्वयामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झाला. प्रत्येक गाण्यानंतर ...