पोस्ट्स

माळेगाव पोलिसांची धाडसी कारवाई! गोरक्षकाच्या मदतीने वाचवले खिलारी गाईंचे प्राण !!

इमेज
महाराज्य टाईम्स: बारामतीत मेडद हद्दिमध्ये खिलारी देशी गाईंची कत्तल करण्याच्या हेतूने डांबून ठेवण्यात आले होते. गोरक्षांच्या माहितीवरून माळेगाव ता.बारामती पोलिसांनी धाडसी कारवाई करुन गाईंना सोडवून प्राण वाचवले आहेत. घटना काय आहे-      मौजे नेपतवळण, ता.बारामती, जि.पुणे गावचे हद्दित अक्षय उर्फ बबलु विजय बागाव, रा.मेडद, ता.बारामती, जि.पुणे याने त्याचे मालकीचे जागेतील पत्राशेड बिलाल कुरेशी, रा.बारामती यास गोवंश जनावरांची अवैधपणे कत्तल करणेसाठी जागा उपलब्ध करून दिली असुन सदर शेडमध्ये बापु कोंडीबा ठोंबरे, रा.मेडद, ता.बारामती, जि.पुणे हा रक्ताचे डाग साफसफाई करताना व पुरावा नष्ट करत असताना मिळुन आला आहे. तसेच सदर शेडचे बाहेर वरील वर्णनाचे एकुण 3 खिलार देशी कुपोशीत गायी कत्तलीचे उद्देशाने चारा-पाण्याची सोय न करता दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत मिळुन आल्या असुन सदर पत्राशेडमध्ये गोवंश मांसाचा तुकडा तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे इत्यादी साहीत्य मिळुन आले आहे.     या गंभीर प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 1) बिलाल कुरेशी(पुर्ण नाव माहीत नाही, रा.बारामती, ता...

पोलिस उपनिरिक्षक व महिला कर्मचार्यावर तरुणाची अरेरावी व दमबाजी करत झाला फरार ! बारामतीत कायद्याचा धाक राहिला नाहि?

इमेज
महाराज्य टाईम्स:       बारामती शहरात तिनहत्ती चौक(तिरंगा चौक) येथे वाहतुक बंदोबस्तावेळी उपनिरिक्षक व महिला कर्मचार्याला अरेरावी करुन एक दुचाकी चालक फरार झाला. पोलिस फौजफाटा असताना असे प्रकार घडत असतील तर कायद्याचा धाक बारामतीत आहे का नाही असा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे.      १२ मे रोजी संध्याकाळी ७ वा सुमारास तिरंगा चौक बारामती येथे नाकाबंदी मोहीम चालु असताना यूनिकॉर्न दुचाकी गाडी नं MH42 BV 8805 ही वरील अनोळखी चालक याने वाहतुक नियंत्रण करणारा सुरक्षा रक्षक जवान नामे केशव रमेश मोरे र.नं.4997 यास शिवीगाळ दमदाटी करुन हाताने मारहाण करीत असताना वाहतूक पोलिस कर्मचारी तेथे पोहचले. महिला कर्मचारी यांनी त्यास वाहतुकीचे नियमभंग केल्यामुळे दंडात्मक कारवाई करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिस कर्मचारी यांना अरेरावीची दमबाजी केली. त्यानंतर उपनिरिक्षक सुभाष काळे यांनी जाब विचारताच त्यांना सुद्धा अरे कारे ची भाषा वापरून अरेरावी करत धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणुन गर्दीचा फायदा घेवुन अधांरात पळुन गेला आहे.      ...

सुनेत्रा पवार भारतात सर्वाधिक मतांने निवडून आल्याबद्दल महिलांसाठी एसटी स्मार्ट कार्ड ..फक्त १३० रु.मध्ये

इमेज
बारामती (दि:८) :महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भारतातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहराच्या वतीने महिलांसाठी विशेष एसटी स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन (दि:८) रोजी करण्यात आले आहे. महिलांना सवलतीच्या दरात एसटी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, शारदा प्रांगण येथे सुरू असलेल्या या शिबिराचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, राष्ट्रवादी शहर पक्ष  कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) सुरज देवकाते, विद्यार्थी अध्यक्ष मेघराज माने, उपाध्यक्ष अन्सारभाई आत्तार, सुधीर पोद्दार, शैलेश वनवे,नवनाथ अपुणे, शब्बीरभाई शेख, अश्विनी तावरे, हेमल शहा, ॲड. रमेश कोकरे,योगेश पवार, सुभाष मोहिते यांच्यासह रा...

परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला २५ वर्षे पूर्ण; भारतातील ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्रात ६,००० रहिवाशांचा टप्पा, भविष्याभिमुख दृष्टीकोन अधोरेखित

इमेज
पुणे, महाराष्ट्र (महाराज्य टाईम्स): — नवे निवासी प्रकल्प साकारण्यात अग्रणी असलेल्या परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) प्रा. लि. या नामांकित विकसकाच्या ‘अथश्री’ या ज्येष्ठ नागरिक निवास उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतातील संघटित ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्राच्या घडणीत ‘अथश्री’ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरदृष्टीतून सुरू झालेला हा उपक्रम आज सन्मान, स्वावलंबन आणि समुदायाधारित जीवनमूल्यांवर आधारलेली सक्षम व्यवस्था बनली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधत, वडोदरा येथे ‘अथश्री’च्या ६,००० व्या रहिवाशाला घराचा ताबा देण्याचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रहिवासी, व्यवस्थापन आणि भागीदार सहभागी झाले होते. आज ‘अथश्री’चे जाळे सुमारे १६ ज्येष्ठ नागरिक वसाहतींमध्ये विस्तारले असून, विविध शहरांमध्ये ३,००० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना निवास व सुविधा दिल्या जात आहेत. कार्यक्रमाची सुरुवात परांजपे स्कीम्सचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्या भाषणाने झाली. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी ‘अथश्री’चा प्रवास आणि वाढती गरज याविषयी मनोगत व्यक्त केले. यानंत...

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्जः प्रकृती पूर्णपणे उत्तम-"सिल्व्हर ओक" वर सक्तीची विश्रांती

इमेज
डॉक्टरांचा पूर्ण विश्रांती घेण्याचा अन् प्रवास टाळण्याचा सल्ला महाराज्य टाईम्स:(बारामती) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून, नियमित वैद्यकीय तपासणीनंतर ते आता आपल्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शरद पवार यांना सोमवारी सकाळी प्रकृती अस्वास्थेमुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेण्यात आले होते. ही तपासणी पूर्णपणे 'रुटीन चेकअप'चा भाग होती. डॉक्टरांनी त्यांच्या सर्व आवश्यक चाचण्या केल्या असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत. तथापि, वाढते वय आणि सततचे दौरे यामुळे येणारा थकवा लक्षात घेता, डॉक्टरांनी त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती घेण्याचा आणि प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. सक्तीची विश्रांती 'सिल्व्हर ओक'वरच शरद पवार साहेबांची तब्येत उत्तम असून ब्रिज कँडी मधून त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या सि...

माझे सर्वस्व हरपले, पण मी खचणार नाही, तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास: सुनेत्रा पवार भावुक

इमेज
(अहिल्यादेवी, येसुबाईंप्रमाणे निष्ठेने जनतेची सेवा करेल; प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक) महाराज्य टाईम्स: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी आपल्या पतीच्या आठवणींनी सुनेत्रा पवार यांना अनेकदा गहिवरून आले. मी माझे सर्वस्व हरपले, पण मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले.    कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेल, असे आश्वासन बारामतीच्या जनतेला दिले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी मनापासून आभार मानते. पवार साहेब व सुप्रिया सुळेंचे विशेष आभार मानते. मला पाठिंबा उत्स्फुर्तपणे जाहीर पाठिंबा देणाऱ्या संस्थ आणि संघटनांचे ऋण व्यक्त करते. हा पाठिंबा म्हणजे बारामतीच्या भवितव्याबद्दलची एकत्रित बांधिलकी आहे, असे मी मानते. पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची...

महात्मा बसवेश्वर जयंती साजरी: आरोग्य शिबिरात १०० नागरिकांनी घेतला लाभ

इमेज
बारामती : (महाराज्य टाईम्स) महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाजाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात विविध रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली. मुक्ताई हॉस्पिटलच्या डॉ. मीनल गवसणे यांनी त्वचारोग तपासणी केली. बारामती हॉस्पिटलच्या वतीने बीपी, शुगर, ऑक्सिजन व ईसीजी तपासणी करण्यात आली. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधा तसेच अल्प दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वेळापूर यांच्या वतीने हार्निया, अपेंडिक्स व मुतखडा यासंदर्भात तपासणी करण्यात आली.             या शिबिराचा सुमारे १०० समाज बांधवांनी लाभ घेतला. नेत्र तपासणीदरम्यान ३ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. याशिवाय डॉ. मीनल गवसणे यांनी १० मे ते २० मे दरम्यान समाज बांधवांसाठी मोफत सल्ला देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, नगरसेवक यशपाल पोटे, नगरसेविका अनुप्...

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

इमेज
महाराज्य टाईम्स: बारामतीचे विकास पुरुष म्हणून जनतेने स्व.अजितदादांना अगदी मनापासून शेवटच्या माणसाने उपाधी दिली होती. आपल्या ह्रदयात एक आदराची जागा निर्माण केली होती. परंतू स्व.अजितदादांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर बारामती पोरकी झाली त्याच प्रमाणें विविध प्रशासनावरील अंकुश व वचक सुद्धा संपला असे एकंदरीत चित्र बघायला मिळत आहे.        स्व.अजितदादांची कामाची पद्धत अत्यंत गतिशील व वक्तशीर होती. त्यामुळे दर शनिवार रविवारी पहाटे पासुनच त्यांचा झंजावात शहरामध्ये व तालुक्यामध्ये पहायला मिळत होता. अनेक विभागाचे अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारि, मुख्याधिकारी, पोलिस प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी दादांच्या अवतीभोवती असायचेच. त्यांना पहाटेच सर्व तयारीने दादांच्या बंगल्यावर हजर रहावे लागायचेच. कारण दादा जनतेच्या विविध कामासंदर्भात कधी कोणाला हाक मारतील सांगता येत नव्हते. त्यामुळे दादांचा प्रचंड अंकुश व आदरयुक्त वचक प्रचंड प्रमाणात होता हे सर्वाना चांगलेच माहिती आहे.      परंतू सध्या अशी परिस्थिती आहे का प्रशासनाची कि त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे ? त...

संगमनेर येथील अल्पवयीन मुलीवरिल अँसिड हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा करावी सुवर्णकार समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन

इमेज
महाराज्य टाईम्स (बारामती) : संगमनेर येथील वडगाव पान येथे कुमारी ईश्वरी डहाळे या चिमुकलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व शिक्षा करण्यात यावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे निवेदन सराफ सुवर्णकार संरक्षण समिती,बारामती च्या वतीने बारामती शहर पोलिस स्टेशन प्रशासनाला देण्यात आले.      संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे राहणाऱ्या संजय डहाळे यांच्या १३ वर्षांच्या इयत्ता ६ वी त शिकणाऱ्या चिमुकली वर अज्ञात माथेफिरूने अँसीड हल्ला करून त्या मुलीला जबर जखमी केले माणूसकीला काळीमा फासणार्या या नराधम समाजकंटकाला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करणयाची मागणी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती व सर्व शाखीय सोनार समाज यांच्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडतील आसा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला ही संतप्त ठाम मागणी समितीच्या वतीने निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.       सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून बारामती शहर पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्राती...

शासकिय शिक्क्यांचा गैरवापर प्रकरण: पत्रकाराच्या पाठपुराव्यामुळे डाॅक्टरवर गुन्हा दाखल

इमेज
महाराज्य टाईम्स: बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा माजी वैद्यकीय अधिकारी डाॅक्टर यांनी बनावट शिक्का तयार करून स्वतःच्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या जखमी व्यक्तीला बोगस शासकीय प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा "लोकशाही" न्यूज चॅनेलचे पत्रकार विकास कोकरे यांनी आक्रमकपणे केल्यामुळे अखेर शहर पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर बारामतीत विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक नंतर बारामतीत सुद्धा पत्रकारामुळेच गुन्हा उघड झाला:     सध्या महाराष्ट्रात नाशिक मधील भोंदुबाबा अशोक खरातच्या महिलांवरील अत्याचार व अघोरी कृत्य यामुळे समाजात तिव्र संतापाचे पडसाद उमटले आहेत. खरतर याप्रकराणाला वाचा फोडली ती स्थानिक वर्तमानपत्र "खबरदार पुढारी" यांच्या पत्रकाराने आणि त्यामुळेच खरात प्रकरणाची पाळेमुळे उघड झाली. अगदी त्याच प्रमाणे शासकिय शिक्क्यांचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक लाभासाठी उपयोग करुन निरपराध व्यक्तीवर कायदेशीर व न्यायालयीन कारवाई करण्यास...

मा.नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी माणुसकी जपली ! ११०० गरजू विद्यार्थ्यांना भेट दिल्या सायकली !! दानशूरपणाचे सर्वत्र कौतुक !!

इमेज
महाराज्य टाईम्स(प्रभाकर बावधनकर):  मोहोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळालेले रमेश बारसकर यांनी वैयक्तिक खर्चातुन ११०० गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटून आपल्या दानशूरपणा व माणुसकी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे त्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.      मोहोळकरांच्या मनात घर करून राहिलेले आपुलकीचे नाव म्हणजे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर कोणताही राजकीय वारसा नसताना, आपल्या कष्टावर, जिद्दीवर आणि प्रामाणिकपणावर उभा राहिलेला हा नेता आज प्रत्येकाच्या मनात आपुलकीने स्थान मिळवून आहे.       शहरातील हजारो गरजू बांधवांना स्वतःच्या खर्चाने विविध प्रकारे मदत व सहकार्याच्या माध्यमातून समाजकार्य करणारा  हा दानशूर, दरियादिल माणूस म्हणजे रमेशजी बारस्कर अनेक कुटुंबांसाठी खरा आधार आहे अशी भावना नागरिकांच्या मनात दिसून येते. त्यांच्या या माणुसकीच्या कार्यामुळे अनेकांच्या आयुष्यात आनंद आणि स्थैर्य निर्माण झाले आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वखर्चाने ११०० सायकलींचे वाटप करून अनेक गरजवंत वि...

आज श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन सोहळा मठांमध्ये भक्तिपुर्ण वातावरणात होतोय साजरा !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स)     आज श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन आहे. त्यानिमित्त बारामती शहरात अनेक ठिकाणी अत्यंत भक्तिमय व धार्मिक वातावरणात साजरा होत आहे.      श्री स्वामी समर्थ  अर्थात  अक्कलकोट स्वामी   (प्रकटकाल   : इ.स. १८५६-१८७८) २२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले अक्कलकोट जि.सोलापूर येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.     इ.स.१८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटला आले. मंगळवेढ्याहुन पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंद...

पहिली अमरावती मग बारामती? नगरपालिका शास्तीकर दंड ५०% सुट देण्यास नगरविकास खात्याच्या आदेशानंतर सुरुवात

इमेज
बारामती (महाराज्य टाईम्स): अमरावती जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील रहिवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. थकीत मालमत्ता करावर आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत ५० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. परंतू बारामतीत मार्च महिन्यातील १८ दिवस होऊनही नागरिकांना दंडाच्या रकमेतुन सुट देण्याची मानसिकता मुख्याधिकारी यांना नसल्याचे दिसून आले.       शास्तिकर दंडामध्ये सुट मिळण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख असून, या कालावधीत कर भरणा करणाऱ्यांना थकीत कराची निम्मीच रक्कम भरून करमुक्त होता येणार आहे. अशा प्रकारची सूट देणारा अमरावती हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ठरला आहे.       यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, संबंधित शहरातील नागरिकांनाही करमुक्त झाल्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. थकबाकीदार असल्यामुळे अनेक नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना अडचणी येत होत्या, ज्याचा अनुभव त्यांना अलीकडील सार्वत्रिक निवडणुकीतही आला होता.     अमरावतीमध्ये नवन...

बौद्ध बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी: सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण

इमेज
बारामतीत सामाजिक सलोख्याचा संदेश; बौद्ध बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी  इफ्तार पार्टी बारामती (महाराज्य टाईम्स):    येथील मानव एकता युवक संघटना,शेरसुहास मित्र मंडळ आणि भारतदादा अहिवळे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधत सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांसाठी आमराई परिसरातील महात्मा फुले नगर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधवांसह मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांसारख्या विविध सामाजिक संघटन व पक्षातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सध्या देशात आणि राज्यात सामाजिक ऐक्याला बाधा येईल असे वातावरण काही शक्तींकडून जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे.आशा देशविघातक शक्तींना रोखण्यासाठी व सर्व जातीधर्मातील सामाजिक एकोपा आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून आपण या इफ्तार पार्टीचे आयोजन करत असल्याचे आयोजक ॲड.सुशील अहिवळे आणि शुभम अहिवळे यांनी सांगितले. याप्रसंगी,माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर,माजी नगरसेवक आसिफ अली खान...

बारामतीकरांचा श्वास बनल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार : अजितदादांप्रमाणेच भरला जनता दरबार !!

इमेज
महाराज्य टाईम्स: (बारामती)  महिलांसह नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय; नागरिकांच्या समस्या ऐकून अधिकाऱ्यांना आदेश. अजित पवारांप्रमाणेच जनता दरबार.          उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी बारामतीतील 'सहयोग' या निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीप्रमाणेच नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांनी केला. या दरबारात नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेण्यात आल्या आणि अनेक प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. विशेषतः महिलांच्या समस्या आणि 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेशी संबंधित अडचणी सोडवण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.        सकाळी पावणे नऊ वाजल्यापासूनच सहयोग सोसायटी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बारामती तालुक्यातील विविध गावांमधून अनेक नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी आले होते. यामध्ये महिलांची संख्या विशेषतः जास्त होती. 'लाडकी बहीण...