पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सणासुदीला होतोय प्रवाशांची अडवणूक? करोडोच्या स्टँडच्या खर्चामुळे होतेय आर्थिक पिळवणूक?

इमेज
          (पुणे व कोल्हापूर कडे जाणार्या शिवशाही बसेस ) महाराज्य टाईम्स:(26 आँगस्ट) सणासुदीच्या व उत्सवाच्या दिवसात बारामती बसस्थानकात प्रवाशांच्या गडबडीच्या वेळेला शिवशाही बस लाऊन जादा भाडे वसूल करण्यासाठी आर्थिक पिळवणूक करुन दुसरा पर्याय नसल्याने अडवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.    ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी किंवा कामावर हजर होण्यासाठी प्रवास करावा लागतो. अशा वेळेस सकाळी सकाळी लवकर पोहचण्याची प्रत्येकालाच घाई व गडबड असते. बसस्थानकात पोहचले की, सकाळी गर्दी व रांग असतेच पण एकावेळेस तीन चार शिवशाही बसेस फलाटाला लागलेल्या असतात. जर प्रवासला साध्या बसने जायचे असेल तर तो दुसर्या साध्या बससाठी वाट बघतो. पण साध्या बसची वाट बघायची वेळ येऊच नये व शिवशाही बसेस लागोपाठ सोडल्या जातात. अशा वेळेस प्रवाशांना कुठलाच पर्याय उरत नाही. मग आर्थिक भुर्दंड व मनस्ताप करुन तिकिट घ्यावेच लागते. जिथं साध्या बसचे पुण्याचे तिकिट भाडे १७७ रु. आहे तर शिवशाहीचे २६० रू म्हणजेच जवळपास १०० रु चा नाहक भुर्दड प्रवाशांना सोसावा लागतो. का तर ...

गणेशोत्सवाला आता राज्य महोत्सवाचा दर्जा: सार्वजनिक मंडळांना 7 दिवस सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी

इमेज
महाराज्य टाईम्स:  राज्य शासनाने गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केला आहे.     ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या ३१ जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार गणेशोत्सवासाठी शनिवार ३० ऑगस्ट, रविवार ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर, २ सप्टेंबर, ३ सप्टेंबर, ४ सप्टेंबर, ६ सप्टेंबर या एकूण ७ दिवसांच्या कालावधीत सदर निर्बंधांना सूट देण्यात आली आहे.      नवरात्री उत्सवासाठी बुधवार १ ऑक्टोबर व गुरुवार २ ऑक्टोबर, ख्रिसमससाठी गुरुवार २५ डिसेंबर आणि वर्षाअखेरसाठी बुधवार ३१ डिसेंबर रोजीही या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी देण्याच्या अन...

स्वातंत्र्यदिना दिवशीच १७ वाहनांवर वाहतुक पोलिसांची धडक कारवाई; १२ अल्पवयीन मुलांचा समावेश

इमेज
*देशभक्तीच्या दिवशी नियमभंगाविरुद्ध वाहतूक पोलिसांची धडक मोहीम* बारामती दि.१५ (महाराज्य टाईम्स)     स्वातंत्र्य दिनाच्या देशभक्तीच्या उत्सवात काही तरुणांनी देशभक्तीपेक्षा 'दणका' आणि 'थाट' दाखवण्याचा प्रयत्न केला. बुलेटवर कानठळ्या बसवणारे सायलेंसर, स्पोर्ट्स बाईकचा अति वेग, ट्रिपल सीट मस्ती आणि वेडीवाकडी वाहने चालवून सुसाट गाडी पळवण्याचा रोडशो त्यांनी शाळा-काॅलेजच्या रस्त्यांवर उभा केला. मात्र बारामती वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या सजगतेसमोर त्यांचा हा  'रोडशो' काही क्षणात थंडावला.         एम.ई.एस.शाळा, बालविकास शाळा, देशपांडे शाळा, टेक्निकल हायस्कूल, अनेकांत शाळा या परिसरात सकाळपासूनच उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वाहतूक शाखेची विशेष पथके तैनात केली. या पथकांनी अभ्यासपूर्वक नाकाबंदी केली. काही वाहने पकडण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष पाठलाग केला. ट्रिपल सीट बसून, मोठा आवाज करत, अति वेगाने व झिगझॅग वाहन चालवणाऱ्यांना थेट जागीच थांबवून दंड ठोठावला. आजच्या मोहिमेत एकूण १७ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली. त्यात ९ बुलेट, १ यामाहा, १ केटी...

बारामतीत स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज स्तंभाचे होणार लोकार्पण

इमेज
बारामती (महाराज्य टाईम्स): राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य प्रतिक असलेला बारामती शहरातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ येत्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) लोकार्पित केला जाणार आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या हस्ते  व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता तीन हत्ती चौकातील नटराज नाटय कला मंदीरासमोरील जागेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी ही माहिती दिली.   बारामती शहरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) तीस मीटर उंचीचा (शंभर फूट उंच) राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा स्तंभ साकारण्यात आला आहे. बारामतीला स्वातंत्र्य चळवळीसह स्वातंत्र्य सैनिकांचा वैभवशाली वारसा आहे. या पार्श्वभूमीवर देशभक्ती अधिक जाज्वल्य व्हावी या उद्देशाने हा स्तंभ उभारण्यात आल्याचे किरण गुजर यांनी नमूद केले.  दरम्यान राष्ट्रध्वज स्तंभ लोकार्पण सोहळ्यानिमित्त देशभक्तीपर गीत व नृत्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे, सोबतच फटाक्यांची आतषब...

स्वातंत्र्य सैनिकांच्या उपोषणाला खा.शरद पवारसाहेब व युगेंद्र पवार यांचा जाहिर पाठिंबा

इमेज
बारामती दि.१४ (महाराज्य टाईम्स) शहरातील भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभ इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सदर हुतात्मा स्तंभ अन्य ठिकाणी हलवू नये,  या मागणीसाठी  राज्यातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे उत्तराधीकारी निषेध व्यक्त करण्यासाठी नगर परिषदच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण करत आहेत.     सदर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) चे नेते युगेंद्रदादा पवार हे उपस्थित राहिले होते. त्यांनी भाषणामध्ये हुत्मात्मा स्तंभ अडगळीच्या जागी हलवण्याच्या निर्णयाला कडाडून ठामपणे विरोध केला. आदरणीय शरद पवार साहेब ब मी स्वातंत्र्य सैनिकांच्या भुमिकेसोबत असुन उपोषणाला १००% पाठिंबा देत आहोत असे सांगितले. युगेंद्र पवार पुढे म्हणाले विकास काय सगळेच करतात आम्ही करतो तुम्ही करता पण हुतात्म्यांचा अवमान करुन विकास करत असाल तर आमचा ठाम विरोध आहे. पवार साहेबांना विद्यार्थी दशेत व राजकिय जिवनात तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे कायम त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत हे जाहीरपणे मी सांगतो.     ...

नाव मोठ्ठ लक्षण खोठ्ठं !! एसटी स्टँडवर रक्षाबंधनलाच लाडक्या बहिणींचे हाल?

इमेज
बारामती: (दि.१० महाराज्य टाईम्स)       बारामतीत विमानतळासारख्या दिसणार्या एसटी स्टँडवर गाड्याच्या निकृष्ठ नियोजनामुळे ऐन रक्षाबंधन दिवसालाच लाडक्या बहिणीला होतोय प्रचंड त्रास      शनिवार रविवार व रक्षाबंधन सलग असल्यामुळे बारामतीत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाहेरगावाहून अनेक परिवार आले आहेत. आपल्या भावाला राखी बांधायला तर काही भाऊ बहिणींकडे जात आहेत. त्यामुळे बारामती एसटी स्टँडवर सणासुदीमुळे प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आली. विमानतळासारखे दिसणारे बसस्थानक असे नावाजले गेले पण प्रत्यक्षात जैसे थे परिस्थिती बघायला मिळत आहे. असुविधांच्या बाबतीत अनेक पत्रकारांनी लेखणीच्या व बातमीच्या माध्यमातून आवाज उठवला पण ढिम्म प्रशासन कानाडोळा करत असताना दिसतोय का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.      आज रविवार असल्यामुळे महिलांची प्रचंड गर्दी स्टँडवर होती. आणि जास्त करुन दौंड व इंदापुरला जाणार्या गाड्यांच्या फलाटावर अति प्रमाणात महिलां गाड्यांची वाट बघत ताटकळत केविलवाण्या चेहर्यानि उभ्या असलेल्या दिसल्या. बर्याच लाडक्या बहिणींनी महाराज्य ...

स्वातंत्र्याच्या क्रांतीविरांना मानवंदना देण्यासाठी उद्या क्रांतीदिन साजरा करण्याचे आयोजन

इमेज
महाराज्य टाईम्स(८ आँगस्ट): क्रांती दिनाच्या आठवणी उजळ करण्यासाठी शनिवार ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्तंभ वंदे मातरम चौक, (भिगवण चौक) या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन      ब्रिटिशांची दीडशे (१५०) वर्ष जुलमी राजवट आपल्या देशावर होती. या पारतंत्र्याच्या जोखंड्यातून जनतेला मुक्त करण्यासाठी सण अठराशे सत्तावन (१८५७) पासून वासुदेव बळवंत फडके या आद्य क्रांतिकारकापासून अनेक वीरांनी प्राणाची आहुती दिली आहे. १९४२ पर्यंत स्वातंत्र्य आंदोलनाची धार जनतेच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झाली होती. अनेक क्रांतिकारकांनी शसस्त्र उठाव केला. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.प्रत्येक जण आपापल्या विचाराप्रमाणे व शक्तीप्रमाणे कार्यरत राहिले.         दिनांक ८ ऑगस्ट १९४२ हा दिवस एक आगळा आणि वेगळ्या घटनांनी जागतिक इतिहासात अजरामर झाला.त्यादिवशी मुंबई येथील गोवा लिया टॅंक या मैदानावर अखिल भारतीय काँग्रेसची बैठक झाली.आणि त्या बैठकीमध्ये अहिंसक आणि सत्याग्रही मार्गाने चळवळीचा विडा उचललेल्या पूज्य महात्मा गांधींनी *"चलेजाव" (...