मनुष्याने मानवी गुणांनी युक्त होऊन जीवन जगावे...!! निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज
*बारामती येथे हर्शोल्हासात पार पडला एक दिवसीय निरंकारी संत समागम* (संत समागम साठी प्रचंड संख्येने उपस्थित भक्त परिवार) बारामती (महाराज्य टाईम्स) - “मनुष्य जीवन अनमोल आहे. त्याचा मुख्य उद्देश लक्षात घेऊन ब्रह्मज्ञानाद्वारे ईश्वराची ओळख करून भक्ती करावी आणि मानवीय गुणांनी युक्त होऊन सुंदर जीवन जगावे. असे उदगार सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी काढले. सदरचा निरंकारी संत समागम बारामती येथील टी सी कॉलेजच्या भव्य मैदानावर मंगळवारी (ता. 6) आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्यांनी वरील उदगार काढले. या समागमास बारामती परिसरासह, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, संभाजीनगर, उस्मानाबाद आदी भागातून पन्नास हजाराहून अधिक श्रद्धाळू भाविक सज्जनांनी सद्गुरू माताजींच्या दिव्य दर्शनाचा आणि प्रवचनाचा लाभ घेऊन सत्संगचा मनमुराद आनंद लुटला. भक्तीचे सार समजवताना सद्गुरु माताजी पुढे म्हणाल्या की, आपण सर्वांनी प्रेम आणि भक्तीपूर्ण जीवन जगले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या या मनुष्य जीवनाचे सदैव सुंदर कर्म...